कहाणी... भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाची...
अ-सत्यमेव जयते...?
तुम साला गुलाम लोग हमारी जूती के नीचे ही रहेगा... लगान या चित्रपटात एका मग्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तोंडी असलेलं हे वाक्य आपल्याला नेहमीच बोचतं, कारण तुमचा जन्म गुलामीसाठीच झाला आहे " हे ठसवणारा खोटा इतिहास...
अ-सत्यमेव जयते...?
होय... अ-सत्यमेव जयते असेच सुरू आहे... भारताच्या इतिहासाची अक्षम्य हेळसांड केली गेली... जाणीवपूर्वक पिढ्यानपिढ्या दिशाभूल केली गेली... ज्या भारतातून सोन्याचा धूर निघत असे, ज्या समृद्ध, वैभवसंपन्न भारताचा शोध घ्यायला कोलंबस आणि वास्को-द-गामा युरोपबाहेर पडले, ज्या भारताचा १८ व्या शतकापर्यंत जागतिक व्यापारात २४ टक्के वाटा होता, त्या भारताला योजनाबद्धरीतीने कलंकित करण्यात आलं, मानसिकदृष्ट्या अपंग बनवण्यात आलं, जे जे भारतीय ते ते अभद्र आणि सारे भारतीय कपाळकरंटे असं बिंबवण्यात आलं... सत्याचा सातत्याने विपर्यास करून असत्यमेव जयते अशा बेमुर्वतखोरपणे आरोळ्या ठोकण्यात आल्या...
सत्याचा संदर्भासहित शोध घेणारं, असत्याच्या भिंती जमीनदोस्त करणारं, खरा इतिहास ठामपणे मांडणारं, अभिजित जोग याचं अतिशय विलक्षण असं अभ्यासपूर्ण पुस्तक...
असत्यमेव जयते...? (मराठी)
किंमत : रु. ५९९/-
पाने : ४४०